गुरुतत्त्वाचार……२६/१२

।। गुरुतत्त्वाचार ।।
२६/१२/२०१९
आनंद व गुरुप्राप्ती साठी, दहा पायऱ्यांचे अवलोकन !

(गुरुतत्त्वाचार हे सदर आपण सुरू केल्या पासून नियमित पणे आपण वाचत आहात, आपल्याला ते आवडत आहे, ते आपल्या अभिप्राय वरून कळत आहे.बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय की गुरू करायचा का? आपण गुरू करू शकत नाही तर आपण शिष्य म्हणून आपली पात्रता वाढवू शकतो )

(दहावी पायरी त्याग)
आपल्या जीवनात आनंद येण्यासाठी व गुरुप्राप्ती होण्यासाठी म्हणजेच आपली शिष्य म्हणून पात्रता होण्यासाठी कशाप्रकारे साधना व्हायला हवी या साठी आता पर्येंत आपण दहा पायऱ्या बघितल्या त्या कुठल्या थोडक्यात बघूया.
१.प्रारब्धा चा स्वीकार करणे.
मला होणारा त्रास हे माझे प्रारब्ध आहे.त्यासाठी दुसरा कोणीही जवाबदार नाही. हे मान्य करून. मनाला शरीरावर होणाऱ्या त्रासातून दूर करणे.
2.चांगले क्रियामान कर्म करणे,
शरीराला होणारा त्रास प्रारब्धाने होतो,मन मात्र त्यात अडकत असल्यामुळे मानसिक त्रास होतो, जीवनाचा खरा अर्थ परमार्थ आहे . मग त्यासाठी प्रयत्न पूर्वक मनाला या चांगल्या कर्माकडे वळविणे
3.सात्विक आचरण.
चांगले क्रियामान करीत असताना, आपले आचरण सुद्धा सात्विक राहण्यासाठी प्रयत्न पूर्वक करावे लागेल , आचरणाला खूप महत्व आहे.
4.मन प्रसन्न ठेवणें
वरील ती गोष्टी जर प्रामाणिक पणे आपण केल्या तर ,मन प्रसन्न ठेवता येईल. मन प्रसन्न ठेवणे हेच साधनेचे साध्य असते. मन हेच ईश्वरा कडे घेऊन जाते किंवा रसातळाला घेऊन जाते
5. साधना मार्ग
ईश्वराकडे घेऊन जाणारे मुख्य चार मार्ग आहेत, आपल्या प्रकृती नुसार एक मार्गावर सुरुवात करावी,त्या मार्गावर साधना करीत शिष्य होण्यासाठी पात्रता वाढते,
6.गुरुप्राप्ती साठी प्रयत्न
कश्या प्रकारे जीवनात गुरू येतील, यासाठी शरीर , मन बुद्धी वापरून साधना सर्वेतो परी साधना करणे
7.चिंतन
चिंतानाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. चितनानेच आपले गुण दोष कळून येतात. चितनानेच मन साधनेत स्थिर होत.
8.मनासाठी साधना नामस्मरण
ज्या संतांचे तत्त्व आपल्याला मनापासून आवडते ते आपल्या जीवनात आणण्यासाठी त्यांनी दिलेले नाम किंवा त्यांचे नामस्मरण करावे. याने मन स्थिर होते
9.शरीराने करायची साधना म्हणजे सतसेवा .
सतसेवेने अहं व अहंकार दूर होतो, अंगी नम्रता येते, हातून ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाची सेवा घडते.
10. त्यागाला परमार्थात फार महत्व आहे.
आसक्ती दूर होणे म्हणजे त्याग, तण, मन, धन एवढेच नव्हे तर ईश्वरी कार्या साठी सर्वस्व वाहने हा त्याग आहे
अश्या 10 पायऱ्या आपण बघितल्या , या पायऱ्या जस जश्या आपण चढत जाऊ तास तशी आपली अध्यात्मिक प्रगती होत जाईल. अध्यात्मिक प्रगती म्हणजे काय तर चिरंतन टिकणारा आनंद प्राप्त होणे यासाठी गुरुतत्त्व मार्गदर्शकाची जीवनात खूप गरज असते. या साधने मुळे मार्गदर्शक गुरू म्हणून आपल्या जीवनात येतील.मग सर्वात महत्वाचा गुण आपल्यात असणे फार गरजेचे असते तो म्हणजे आज्ञापालन

-गुरूतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष श्यामराव जोशी,दादा
(गुरूतत्व प्रतिष्ठांन संस्थापक, गुरुतत्त्व मासिक संपादक)

गुरुतत्त्वाचार……

।। गुरुतत्त्वाचार ।।
२५/१२/२०१९
आनंदप्राप्ती – गुरुप्राप्तीसाठी त्याग ही दहावी पायरी आहे

(गुरुतत्त्वाचार हे सदर आपण सुरू केल्या पासून नियमित पणे आपण वाचत आहात, आपल्याला ते आवडत आहे, ते आपल्या अभिप्राय वरून कळत आहे.बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय की गुरू करायचा का? आपण गुरू करू शकत नाही तर आपण शिष्य म्हणून आपली पात्रता वाढवू शकतो )

(नववी पायरी सतसेवा)

स्वतःच्या पारमार्थिक उन्नती साठी दररोज त्याग करा !!

आनंद व गुरुप्राप्तीसाठी त्यागाला फार महत्व आहे.त्याग हा बाह्य गोष्टींचाच नव्हे आंतरिक गोष्टींचा होणे गरजेचे आहे, त्याग एक भाव आहे. ज्यामुळे भाव निर्मिती होते. त्यागातूनच आनंद मिळतो, स्वतः आपण जेवून जितके समाधान मिळणार नाही , त्या पेक्षा अधिक आनंद समाधान जो भुकेला आहे. त्याला अन्न दिल्यावर होतो. यावर स्त्री चे उदाहरण द्यावे लागेल ती सकाळी उठल्या पासून दिवस भर राबत असते.पती,मुलं, सासू, सासरे स्वतः कडे तिचे लक्षच नसते, सगळ्यांसाठी उत्तम असा आहार, जेवण करते. सगळ्यांना पोटभर जेवू घालते . सगळ्यांच झाल्यावर जे काही उरले असते ते खाते , सगळे जेवले यात तिला आनंद वाटतो, ती घरासाठी राबराब राबते मात्र कोणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही,याला म्हणतात त्याग एक दोन दिवस नव्हे तर वर्षनुवर्षे करीत असते. म्हणून म्हटले आहे की पुरुष जे काही धार्मिक कृत्य करीत असतो त्यातील अर्ध पुण्य हे त्याच्या स्त्रीला मिळते.
असाच त्यागाचा भाव आपल्यात निर्माण होऊन दररोज आपण त्याग करीत गेलो तर आपल्यात नम्रता कायम राहील. दुसर्यांना देण्यातच आपला आनंद आहे . हे कळायला लागेल त्याग म्हणजे फक्त पैशाचा नव्हे, उलट पैशाचा त्याग हा लवकर होतो. मात्र तन, मन, यांचा त्याग लवकर होत नाही, कारण यांच्या सोबत असतो तो अहं – अहंकार, तो त्याग करू देत नाही. शरीराचा त्याग म्हणजे गुरू कार्याला देह चंदना प्रमाणे झिजविणे,चंदन स्वतः झिजत मात्र गंध ईश्वराला लावतात,त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो.मन सुद्धा ईश्वर-गुरू चरणी समर्पित व्हायला हवे, मनाचा त्याग करून ते मन , बुद्धी याने अध्यात्माच्या प्रचार प्रसार करण्यासाठी समर्पित केला तर आपल्याला खरा आनंद व गुरुप्रति व्हायला मदत होते.
ईश्वरी कार्यात आपण तण,मन,धन व प्राण समर्पित करून सहभागी झालो तर , पारमार्थिक उन्नती फार जलद गतीने होते. कारण गुरुतत्त्व प्रत्येक जीवाची पारमार्थिक उन्नती व्हावी यासाठीच अवतार धारण करून कार्य करीत असते. या कार्यात जर आपण सहभागी झालो तर त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर लवकर होते.
त्याग वाटतो तितका सोपा नाही, स्वतःचा अहंकार जाळून गुरुतत्त्व कार्य करणे ,हे कठीण असते,. पदोपदी परीक्षा होत असते.
अहंकार गळून गेल्या शिवाय अंगी नम्रता येत नाही.
मन जस जशे शुद्ध ,सात्विक , पवित्र होते ,तस तसा त्याग हा वाढत जातो , तो पर्येंत त्याग हा स्वतःहून करावा लागतो, त्याग म्हणजे फक्त वस्तूचा त्याग नव्हे, तर त्या वस्तू बद्दल ची आसक्ती दुर होणे .,याच प्रकारे शरीराचा त्याग करणे म्हणजे स्वतःहून वेळ काढून सेवा करणे,मनाने नाम घेणे, बुद्धीने गुरू कार्याचा विचार करणे,अश्या प्रकारे स्वतःहून त्याग करीत गेल्यावर हळू हळू वृत्तीत बदल घडून येतो, स्वतःची पात्रता वाढत जाते, म्हणून त्याग करायला आज पासूनच सुरुवात करा , दररोज नियमीतपणे करा”

गुरूतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष श्यामराव जोशी,दादा
(गुरूतत्व प्रतिष्ठांन संस्थापक ,गुरुतत्त्व मासिक संपादक)

गुरुतत्त्वाचार ……..


२४/१२/२०१९
आनंदप्राप्ती – गुरुप्राप्तीसाठी सतसेवा ही नवंवी पायरी आहे

(गुरुतत्त्वाचार हे सदर आपण सुरू केल्या पासून नियमित पणे आपण वाचत आहात, आपल्याला ते आवडत आहे, ते आपल्या अभिप्राय वरून कळत आहे.बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय की गुरू करायचा का? आपण गुरू करू शकत नाही तर आपण शिष्य म्हणून आपली पात्रता वाढवू शकतो )

(आठवी पायरी नामस्मरण )

*आनंदप्राप्ती – गुरुप्राप्तीसाठी सतसेवा फार महत्त्वाची आहे.जसे नामस्मरण ही मनाची सेवा आहे. त्याच प्रकारे सतसेवा ही शरीराची सेवा आहे.* शरीराने ज्या वेळी आपण सेवा करीत असतो त्यावेळी *मन,शरीर , बुद्धी हे त्या सेवेत रत असते, सतसेवा म्हणजे ,* सत म्हणजे परमेश्वर , *परमेश्वर हा निर्गुण स्वरूपात आहे त्याचे सगून स्वरूप म्हणजे समाज या समाजाची सेवा करणे म्हणजे सतसेवा आहे.* सतसेवा ही निरपेक्षपणे केली जाते *यात कुठलिही अपेक्षा नसते.व्यवहरात प्रपंचात आपण जे काही करीत असतो त्या मागे अपेक्षा असतात.* मी तुमच्या साठी केले आता तुम्ही माझ्यासाठी करायलाच हवे, जर *त्यांनी केले नाही तर दुःख होते. म्हणून अपेक्षेने केलेल्या कुठल्याही सेवेतून शेवटी दुःखच प्राप्त होत असते.* म्हणून सेवा ही *निरपेक्ष व निःस्वार्थ पणे व्हायला म्हणजे ती सतसेवा होते.* सेवा केल्याने *अहंकार, अहंभाव कमी होण्यास मदत होते.* अंगी नम्रता येते.म्हणून असे म्हंटले आहे की ” *नम्र झाला भुता,त्याने अनंता कोंडीला “* म्हणजे *पंचमहाभूतापासून तयार झालेले शरीर जर नम्र झाले तर अनंता म्हणजे ईश्वराला प्राप्त करता येते. म्हणून नम्रतेला फार महत्त्व आहे. नम्रता ही फक्त सतसेवेनेच येते.* सतसेवा ही स्वतःची होत नसते. *स्वतःसाठी जे आपण करीत असतो ती स्वार्थ असतो तर तर इतरांसाठी तन ,मन,धनाचा त्याग करणे याला परमार्थ म्हणतात.दुसऱ्या साठी शरीराने सेवा करणे, मनाने त्याचे दुःख दूर व्हावे म्हणून प्रार्थना करणे, आपल्या जवळ असलेल्या धनाचा त्याग करणे ,* अश्या प्रकारे होणाऱ्या सेवेला सात सेवा म्हणतात. *सेवेला मोबदला नसतो, सेवा करणे म्हणजे मालकाने जे काम सांगितले उत्तम करण, येथे स्वतःचा विचारच नसतो,* मालक जसा सांगेल तसे वागणे, *आपला मालक कोण आहे तर ईश्वर* त्याची सेवा करायची आहे. *सेवेला काळ वेळ याचे बंधन नसते* .अशी सतसेवा करणे याला सेवेकरी म्हणतात *सर्वोत्तम सेवा ही अध्यात्माचा प्रचार प्रसार करणे होय,* कारण इतर सर्व सेवा या भावनिक पातळीवरील असतात. व *अध्यात्माची सेवा ही भावयुक्त असते.* भावनिक स्तरावरील सेवेत अपेक्षा असते . *आपली अपेक्षा जर पूर्ण झाली नाहीतर दुःख होत,* *अध्यात्माचा प्रचार प्रसार म्हणजे दुःखी कष्टी लोकांना परमेश्वरापर्येंत जाण्याचा योग्य मार्ग सांगणे आहे* ,ही सेवा करणाऱ्या ला तर आनंद मिळतोच सोबत तो ज्यांना साधना सांगत असतो, त्यांनी सुद्धा साधना केल्यावर आनंद प्राप्त होतो. *गुरुतत्त्वाच्या या कार्यात समर्पित वृत्तीने सहभागी होऊन कार्ये करणे हीच खरी सतसेवा आहे,* यातून मिळतो तो *कधीही न लय होणार चिरंतन असा* *आनद,कसा मिळेल याची *मार्गदर्शन करण्यासाठी गुरुप्राप्ती होते म्हणून सत सेवेत सहभागी व्हा.*

  • गुरूतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष श्यामराव जोशी दादा (गुरुतत्त्व प्रतिष्ठांन संस्थापक,गुरुतत्त्व मासिक संपादक)

Assertively parallel

Image: Gurutattva Pratishtan

Objectively underwhelm ubiquitous information whereas fully tested innovation. Distinctively fabricate backward-compatible information whereas alternative schemas. Assertively cultivate.